आता शेतकरी करू शकणार मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी

महसूल व कृषी विभागाच्यावतीने स्वातंत्र्य दिनापासून ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
आता शेतकरी करू शकणार मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी
आता शेतकरी करू शकणार मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणीSaam tv news

रश्मी पुराणिक

मुंबई : महसूल व कृषी विभागाच्यावतीने (Department of Revenue and Agriculture) स्वातंत्र्य दिनापासून ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण सह्याद्री अतिथीगृह येथे इलेक्ट्रोनिक कळ दाबून करण्यात आले. टाटा ट्रस्टच्या (Tata Trust) सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. "माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा" असे या प्रकल्पाचे बोधवाक्य आहे. (Farmers will now be able to register their crops through the mobile app)

हे देखील पहा-

याप्रसंगी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबाबत माहिती दिली. शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारित शेतकऱ्यांना पीक कर्ज ही दिले जाते. मात्र दोन तीन गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही असा शेतकऱ्यांचा कायम आक्षेप होता, आता महसूल विभागाने आपल्या पिकाची रिअल टाईम नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. महसूल विभागाने यासाठी स्वतंत्र अप्लिकेशन निर्मिती केली आहे.

आता शेतकरी करू शकणार मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी
न्यायालय राज्यपालांना आदेश देऊ शकत नाही, पण...

टाटा ट्रस्टच्या सहाय्याने या ॲप्लिकेशन ची निर्मिती करण्यात आली आहे. या मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये शेतकरी पिकांची माहिती भरतील, तलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील. यामुळे पीक पेरणीची रियल टाइम माहिती अप्लिकेशन मध्ये संकलित होणार आहे. तसेच ही माहिती संकलित होताना पारदर्शकता येणार आहे.

पीक पाहणी नोंदणीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवल्यामुळे पीक विमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल. शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यातही यामुळे सुलभता येईल. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि मदत देणे ही शक्य होईल.

ई पीक पाहणी मुळे राज्यातील पिकांचे अचूक क्षेत्र कळणार आहे, त्यामुळे राज्यातील आर्थिक पाहणी आणि कृषी नियोजन करणे शक्य होणार आहे. ई पीक नोंदणी प्रकल्प यापूर्वी प्रायोगिक तत्वावर वीस तालुक्यात राबवण्यात आला होता. त्याला मिळालेल्या यशानंतर हा राज्यभर राबविण्याचा निर्णय महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतला. आज त्यासंदर्भाने राज्य सरकारने शासन आदेश जारी केला.

शिवाय ई पीक पाहणी प्रकल्पाच्या यशस्वी अमलबजावणी साठी राज्य स्तरीय,विभागीय जिल्हा स्तरीय आणि तालुका स्तरीय सनियंत्रण समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. याशिवाय पूर्ण वेळ प्रकल्प अमलबजावणी कक्ष संचालक भूमी अभिलेख, पुणे यांच्या नियंत्रणाखाली सुरू करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com