दुर्दैवी! अतिवृष्टीमुळे हतबल, बँकेनेही कर्ज नाकारले; शेतकऱ्याची आत्महत्या

गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथील घटना
दुर्दैवी! अतिवृष्टीमुळे हतबल, बँकेनेही कर्ज नाकारले; शेतकऱ्याची आत्महत्या
दुर्दैवी! अतिवृष्टीमुळे हतबल, बँकेनेही कर्ज नाकारले; शेतकऱ्याची आत्महत्याविनोद जिरे

बीड : जिल्ह्यात अतिवृष्टीने पहिला बळी घेतल्याचं समोर आलं आहे. अतिवृष्टीमुळे शेतीसह पीक वाहून गेले, तर बँकेने जुने कर्ज थकीत असल्याने नवीन कर्ज नाकारले आहे. यामुळे कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेतून एका 55 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग या ठिकाणी घडली आहे.

हे देखील पहा-

अतिवृष्टी नुकसानीचा हा जिल्ह्यातील पहिलाच बळी आहे. भाऊसाहेब दशरथ पांढरे (वय- 55) वर्ष रा. सिरसमार्ग, ता. गेवराई असे मयताचे नाव आहे. ते अल्पभूधारक शेतकरी होते. घर बांधणीसाठी त्यांनी खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. शिवाय सेंट्रल बँकेचे पीक कर्जही घेतले होते. शेतात त्यांनी सोयाबीन आणि कापसाची लागवड केली होती.

दुर्दैवी! अतिवृष्टीमुळे हतबल, बँकेनेही कर्ज नाकारले; शेतकऱ्याची आत्महत्या
Latur : खाजगी ट्रॅव्हल्स चालकांचे आंदोलन...

मात्र, अतिवृष्टीमुळे पिकासह शेती खरडून वाहून गेली. त्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. या नैराश्येतून त्यांनी दुपारच्या सुमारास घरामागील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान नवीन कर्ज मिळावे यासाठी भाऊसाहेब पांढरे हे बँकेत खेटे मारत होते. मात्र, जुने कर्ज थकीत असल्याने बँकेने नवीन कर्जास नकार दिला होता. दुपारी बँकेतून येताच त्यांनी गळफास घेतला आहे. दरम्यान या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com