धुळे : मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. सततच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यातच धुळे जिल्ह्यात देखील पावसाची संततधार सुरु असल्याने शिरपूर तालुक्यात टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
राज्यभरात सातत्याने पाऊस सुरु आहे. या पावसामुळे होत्याचे नव्हते केले असून खरीप हंगामातील पिकांचा प्रचंड फटका बसला आहे. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात सातत्याने पाऊस पडत आहे. या सततच्या पावसामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटो लागवड केली होती. मात्र पावसाचा जोर वाढल्यामुळे शेतातील झाडे खाली पडली असून झाडावरील टोमॅटो खराब झाले आहेत.
टोमॅटोच्या दरात घसरण
काही दिवसांपूर्वी शेतकरी टोमॅटोला 800 रुपये प्रति कॅरेट या भावाने विक्री करत होते. मात्र पावसामुळे टोमॅटोचा दर्जा घसरला असल्याने सध्या व्यापारी २०० ते २५० रुपये प्रति कॅरेट या दराने खरेदी करत असल्याचे दिसत आहे. भाव कोसळल्याने शेतकऱ्यांचे खर्च सुद्धा वसूल होणे कठीण झाले आहे. व्यापारी खराब माल घ्यायला तयार नाही, त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
पंचनामा करून मदतीची मागणी
शिरपूर तालुक्यातील टोमॅटो दरवर्षी गुजरात, मध्य प्रदेशसह इतर राज्यातील भाजी मंडईत जातो. पण सततच्या पावसामुळे टोमॅटोची गुणवत्ता कमी झाल्याने व्यापाऱ्यांनी मागे हटण्याचा निर्णय घेतला असून यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. खराब झालेला टोमॅटो आता नेमका कुठे द्यायचा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. शासनाने लक्ष घालून बांधावर येऊन पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.