Vijay Wadettiwar: हे पॅकेज शेतकऱ्यांना पुन्हा कर्जाच्या खाईत लोटणारं - विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर आरोप|VIDEO

Impact Of Maharashtra Flood Relief Package: विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारच्या शेतकरी मदत पॅकेजवर टीका केली असून हे पॅकेज शेतकऱ्यांना पुन्हा कर्जाच्या खाईत लोटणारे असल्याचं म्हटलं आहे.

राज्य सरकारने आज अतिवृष्टीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठे पॅकेज जाहीर केले. यावरच आता कॉँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्य सरकारने मदतीचा आकडा फुगवून सांगितला आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याइतकीच मदत आहे.

वडेट्टीवार पुढे म्हणाले की, हे पॅकेज शेतकऱ्यांना पुन्हा कर्जाच्या खाईत लोटणारं आहे. सरकारकडून कर्जमाफीची अपेक्षा होती, पण ती पूर्ण झाली नाही.

यंदाच्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांना या परिस्थितीत खरी मदत मिळणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, वडेट्टीवार यांच्या मते, सध्याच्या पॅकेजमुळे शेतकऱ्यांच्या समस्या अधिकच वाढतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com