Unseasonal Rain : सोलापुरात अवकाळी पावसामुळे टरबूज उत्पादकांचं नुकसान, VIDEO

Solapur News: एकीकडे उन्हाचा तडाखा जोरदार आहे तर पश्चिम महाराष्ट्रात तूफान पाऊस कोसळला आहे, यामुळे फलबागांचे मोठे नुकसान झाले आहेत.

राज्यात सध्या उन्हाचा तडाखा वाढत असला, तरी काही भागांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विशेषतः सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे.

उन्हाळ्यात सर्वाधिक खाल्ले जाणारे फळ म्हणजे टरबूज. वर्षातून एकदाच या फळाला मोठी मागणी असते, त्यामुळे याच हंगामात त्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र, अवकाळी पावसामुळे टरबूजाच्या शेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.

या नुकसानीमुळे शेतकरी मोठ्या चिंतेत असून, सरकारने तातडीने आर्थिक मदत द्यावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com