संपूर्ण राज्यसह काही जिल्ह्यांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हा हवालदिल झाला आहे. झालेल्या नुकसणाची भरपाई मिळावी अशी मागणी राज्यातील शेतकरी करत आहे. याच सगळ्याचा आढावा केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन घेतला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, मेहकर तालुक्यातल्या नुकसानग्रस्त भागात आज केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पाहणी केली. यावेळी मंत्री जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी विचारपूर करत त्यांना आधार दिला, तर प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत. शिवाय जास्तीत जास्त नुकसानाची भरपाई कशी मिळेल, यासाठी सुद्धा आपण राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन मंत्री जाधव यांनी दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.