Uddhav Thackeray News | 3 अस्वस्थ आत्म्यांचं सरकार टिकणार नाही? ठाकरे गटाच्या मुखपत्रातून भाजपवर हल्लाबोल

Uddhav Thackeray News | उद्धव ठाकरे गटाच्या मुखपत्रातून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल

उद्धव ठाकरे गटाच्या मुखपत्रातून पुन्हा एकदा भाजप आणि एनडीएवर जोरदार हल्ला करण्यात आला आहे. घटकपक्षांना फेकलेले हलके पत्ते भाजपला भारी पडणार आहे. मोदी सरकारमध्ये असलेले आत्मे आत्ताच अशांत झाले आहेत. या अस्वस्थ आत्म्यांमुळे सरकार फार काळ तग धरू शकणार नाही. असा दावा ठाकरे गटाच्या मुखपत्रातून करण्यात आला आहे. तसेच सरकारमध्ये मोदी सरकारमधील 3 आत्मे आत्ताच अशांत झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. रालोआवरुनही भाजपला प्रश्न विचारण्यात आला आहे. रालोआला सरकारचा आत्मा म्हणणाऱ्यांना खातेवाटपात त्यांचा विसर पडला का? असा प्रश्नही मुखपत्रातून विचारण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com