उद्धव ठाकरे सरकारने सुरू केलेली ‘शिवभोजन थाळी’ योजना सध्या बंद पडण्याच्या वाटेवर आहे का, असा सवाल उपस्थित होतोय. गरिबांसाठी १० रुपयांत पौष्टिक जेवण देणारी ही योजना अनेक अडचणींमधून जात आहे.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गैरव्यवहाराच्या तक्रारी आढळून आल्यास तात्काळ शिवभोजन केंद्रे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. अनेक केंद्रांवर सातत्याने नियमभंग व अनियमितता आढळून आली असून, यावर कठोर कारवाईचे संकेत देण्यात आलेत. तसेच, महायुती सरकारच्या काळात या योजनेला अनुदान वेळेवर न मिळाल्याने अनेक केंद्रे बंद पडल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. अनुदानात वाढ न झाल्यामुळेही अडचण आणखी वाढली. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्या या योजनेसाठी २० कोटींचं अनुदान मंजूर केलं असून, पुढील निधी २-३ महिन्यांत मिळू शकतो, अशी माहिती मिळतेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.