Maharashtra Politics: उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत? रवींद्र चव्हाण म्हणाले,राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो | VIDEO

Ravindra Chavan Interview: भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना (ठाकरे गट) सोबत पुन्हा युती होण्याची शक्यता नाकारली नाही. राजकारणात शाश्वत मैत्री किंवा वैर नसतं, असं वक्तव्य करत त्यांनी मोठं संकेत दिलं.

भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट या विशेष कार्यक्रमाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक राजकीय आणि त्यांची प्रदेशाध्यक्षपदापर्यंतचा प्रवास सांगितला. तसेच गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अतिशय मित्रत्वाच्या नात्याने बोलताना दिसत आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान फडणवीस यांनी ठाकरे यांना सत्तेमध्ये येण्याची ऑफर देखील दिली होती. अगदी काही दिवसांपूर्वी मुंबईच्या हॉटेलमध्ये फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची देखील भेट झाली होती. फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ठाकरे यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. यावरच रविंद्र चव्हाण यांना विचारले असता की भविष्यात युती होऊ शकते का? यावर ते म्हणाले, राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसता यामुळे कधीही काही होऊ शकते असे सुतोवाच रविंद्र चव्हाण यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com