राज ठाकरेंच्या मनसेचे २ उमेदवार गायब? राजकीय वर्तुळात खळबळ

Ahilya nagar politics : राज ठाकरेंच्या मनसेचे २ उमेदवार गायब झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अहिल्यानगरमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीतील राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 2 उमेदवार गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 24 तासांपासून उमेदवारांचा कुटुंबाशी संपर्क नसल्याचं मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी दिली आहे. नगरमधील केडगाव भाग हा संवेदनशील असल्याने निवडणूक बिनविरोध होण्यासाठी 2 उमेदवारांचं अपहरण केल्याचा संशय मनसेच्या विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी व्यक्त केलाय. राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग असं गायब झालेल्या उमेदवारांची नावे असल्याचे समजतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com