निवडणुकीत ठाकरेंचा पराभव, एकनाथ शिंदे म्हणाले... | VIDEO

BEST election results 2025 : मुंबईतील बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंची जादू चालली नाही. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टीकास्त्र सोडलंय.

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलचा पराभव झाल्यानंतर सत्ताधारी भाजपसह महायुतीच्या नेत्यांनी दोन्ही नेत्यांवर टीकेचा भडिमार केला आहे. पतपेढीसारख्या निवडणुकीचं राजकारण केल्याचा फटका त्यांना बसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनीही जोरदार टीका केली आहे.

घरात बसणाऱ्या लोकांना जनतेनं घरीच बसवलं, अशा शब्दांत शिंदे यांनी ठाकरेंना टोला लगावला. पुढे कोण जाणार, कोण मागे जाणार हे जनता ठरवत असते. म्हणून जे काम करणार त्यांना पुढे नेणार आणि जे घरी बसणार त्यांना घरी बसवायचं, असं महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलं आहे, असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला. लोकांना विकास हवा आहे. कल्याणकारी राज्य हवं आहे. काम करणारे लोक पाहिजेत, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com