Sharad Pawar : अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीत राजकारण नको, शरद पवारांचे सरकारला आवाहन | पाहा VIDEO

Maharashtra Crop Loss : बारामतीत शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोणत्याही प्रकारचे राजकारण करू नये. परिस्थितीला तातडीने मदत पुरवणे आणि शेतकऱ्यांचे नुकसान कमी करणे हा प्राथमिक उद्देश असावा.

बारामतीत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. पवारांच्या राष्ट्रवादीकडून आज काळी दिवाळी साजरी केली जाणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सढल हातानं मदत करण्याची तयारी सरकारची नाही असे पवार म्हणाले आहेत.यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीबाबत सरकारने तातडीने मदत पुरवावी, अशी मागणी केली. शरद पवार म्हणाले की, “अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोणत्याही प्रकारचे राजकारण होऊ नये. सध्या गरज आहे ती शेतकऱ्यांना दिलासा देण्याची.” त्यांनी प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा करावी, असेही सांगितले. राज्यात अनेक भागांत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून केंद्र आणि राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी शरद पवारांची मागणी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com