Sanjay Raut : ''बॉम्बेला मुंबई करण्यामागे त्यांचे योगदान, तर आम्ही काय ....'' राऊतांचा खोचक टोला

Sanjay Raut Press Conference : मुंबईतल्या सर्व उत्तम आणि चांगल्या गोष्टी गुजरातला नेल्या जात आहेत. गुजराती व्यापारी मंडळाच्या फायद्यासाठी सर्व सुरू आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

गेल्या तीन काही वर्षांमध्ये मुंबईच्या मराठी माणसाच्या देवतेचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान भाजपने केला त्याबद्दल त्यांनी माफी मागितली आहे का ?, असा प्रश्न विचारत संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर असून लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले होते. त्यावरून संजय राऊत यांनी गुजरातच्या व्यापारी मंडळावर टीकास्त्र डागलेले बघायला मिळाले.

गुजरातचे व्यापारी मंडळ महाराष्ट्राच्या राजधानीवर सातत्याने हल्ले करत आहे. मुंबई लुबाडण्याचा त्यांचा डाव सुरू आहे. मुंबईतल्या सर्व उत्तम आणि चांगल्या गोष्टी गुजरातला नेल्या जात आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे इतके वर्ष बॉम्बेचं मुंबई व्हायलाच पाहिजे पाट्या मराठीत व्हायलाच पाहिजे हे जे आंदोलन 50 वर्षापासून आम्ही केली सर्व स्तरावर आमच्या काही इतर पक्षातील सहकाऱ्यांनी हा विषय कोर्टात नेला आणि आता शहा म्हणत आहेत बॉम्बेला मुंबई करण्यामागे त्यांचे योगदान आहे, मग आम्ही काय (गोट्या....) खेळत होतो? असा टोला राऊतांनी लगावला. गुजराती व्यापारी मंडळाचा फायदा व्हावा म्हणून उद्योग, व्यापार, इंटरनॅशनल फिनान्स सेंटर, आंतरराष्ट्रीय वित्त केंद्र, आमच्या जमीन, आमची प्रतिष्ठा हे तोंडायचं काम सुरू आहे. गुजराती व्यापारी मंडळाच्या फायद्यासाठी त्यांनी शिवसेना तोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील त्यासाठीच तोडली, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com