Maharashtra Politics: राज ठाकरे देश सोडून जाणार होते, पण आम्ही थांबवलं – रामदास कदम यांचा गौप्यस्फोट|VIDEO

Ramdas Kadam Statement: रामदास कदम यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे राक्षसी महत्वाकांक्षा बाळगतात, तर राज ठाकरे देश सोडून जाणार होते.

राज ठाकरे देश सोडून जाणार होते, पण मी आणि बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना थांबवलं, असं खळबळजनक वक्तव्य शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप झाला आहे.

रामदास कदम साम टीव्हीशी संवाद साधताना म्हणाले, उद्धव ठाकरे कसला मराठीचा मुद्दा हातात घेता आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान मोदींनी दिला. त्यांनी आमचा सन्मान राखला.पण ज्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना पहिली पासून हिंदी शिकवण्याचा निर्णय स्वीकारला. ते उद्याच्या मोर्चाला कसे असू शकतात? राज ठाकरेंची भूमिका स्पष्ट असते. पण उद्धव ठाकरे हे राक्षसी महत्वकांक्षी आहे. अशी जहरी टीका रामदास कदम यांनी केली. पुढे त्यांनी खळबळजनक खुलासे केले. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. शेवटी राज ठाकरे कंटाळून देश सोडून निघाले होते. पण आम्ही त्यांना थांबवले असा गौप्यस्पोट रामदास कदम यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com