राजकीय वर्तुळातून आताची सर्वात मोठी बातमी समोर आलीये. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी एक मोठं वक्तव्य केलंय. ठाकरे बंधू एकत्र येतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे दोन्ही गटही एकत्र येण्याबद्दल चर्चा रंगलीय. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलंय.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तसंच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत असतील तर मला आणि प्रकाश आंबेडकरांना एकत्र यावं लागेल, असं विधान रामदास आठवलेंनी केलंय. रामदास आठवले यांच्या या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. त्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत असतील तर मला आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र यावं लागेल. तरी मला असं वाटतं की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार नाहीत.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल आणि त्याचा आम्हाला फायदा होईल. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांना एकत्रित यायचं असेल तर त्यांनी यावं. पण त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फारसा बदल होणार नाही, असा देखील टोला त्यांनी यावेळी लगावला. तसंच, त्यांनी असे देखील सांगितले की, 'शरद पवार हे अजित पवार यांच्यासोबत एकत्र येऊन त्यांचा एनडीएला पाठिंबा मिळत असेल तर शरद पवार यांचे स्वागतच आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.