मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीचा आरोप करत विरोधकांनी आज, शनिवारी निवडणूक आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा काढला. या मोर्चात मनसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष या प्रमुख राजकीय पक्षांसह महाविकास आघाडीतील इतर पक्षही सहभागी झाले होते.
विरोधकांच्या या सत्याच्या मोर्चाला चर्चगेटपासून सुरूवात झाली. त्याचं नेतृत्व मनसे प्रमुख राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, शेकापचे जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, सुप्रिया सुळे यांच्यासह इतर प्रमुख नेते मोर्चाच्या स्थळी पोहोचले. सकाळपासूनच चर्चगेट परिसरात मनसे, शिवसेना आणि महाविकास आघाडीतील घटकपक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोहोचले होते.
या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला. सगळे बोलत आहेत दुबार मतदार आहेत. आम्ही बोलतोय, भाजपचे लोक बोलतात. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील लोक बोलताहेत. मग निवडणुका घेण्याची घाई का, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. मतदार याद्या साफ करा, पारदर्शक याद्या केल्यावर यश-अपयश कोणाचे हे स्पष्ट होईल, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच राज ठाकरे यांनी भर सभेत दुबार मतदारांचा पुरावा देखील दाखवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.