VIDEO : NDA सरकार कधीही कोसळू शकतं; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

Rahul Gandhi Big Claim On NDA Government : केंद्रातील भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकतं, असा दावा राहुल गांधी यांनी केलाय.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळालेल्या काँग्रेस पक्षाचे खासदार आणि नेते राहुल गांधी यांनी मोठा दावा केला आहे. केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकतं, असं ते म्हणाले. राहुल गांधी यांनी केलेल्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

एनडीए सरकारची परिस्थिती खूपच नाजूक आहे. २०२४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर लोकसभेतील संख्याबळ खूपच कमी झालेली आहे. त्यामुळे छोट्याशा गोष्टीमुळं एनडीए सरकार कोसळू शकतं, असं राहुल गांधी म्हणाले.

तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यानंतर राहुल गांधींनी हा दावा केल्यानं राजकीय वर्तुळ पार ढवळून निघालंय. एनडीए सरकारची परिस्थिती नाजूक आहे. एखाद्या घटकपक्षाला दुसरा पर्याय शोधावा लागू शकतो, असंही ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com