धक्कादायक! पीएम किसान सन्मान योजनेतून 2588 शेतकरी वगळले; तुमचं नाव यादीत आहे का? VIDEO

Pm Kisan E-Kyc Problems And Solutions: धाराशिव जिल्ह्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेतून 2,588 शेतकरी अपात्र ठरले आहेत. ई-केवायसी अपूर्ण, आधार-बँक लिंक नसणे आणि एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांनी लाभ घेतल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

धाराशिव: केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत पाञ शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यात 6 हजार रुपयांचा निधी मिळतो. मात्र 20 वा हप्ता दिल्यानंतर लागु करण्यात आलेल्या काटेकोर निकषामुळे धाराशिव जिल्ह्यात 2 हजार 588 शेतकरी अपात्र ठरले आहेत. प्रामुख्याने ई केवायसी प्रक्रीया अपुर्ण ठेवल्याने तसेच बँक खाते आधार कार्डशी जोडल्याने आणि कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांनी लाभ घेतल्यामुळे ही लाभार्थी संख्या कमी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com