फलटण प्रकरणावरुन राज्यात राजकीय ताप वाढला आहे. SIT स्थापन करा अन्यथा आम्ही फलटणला येऊ.असा इशारा देत विरोधकांनी सरकारवर जोरदार टिका केली आहे. रुपाली चाकरणकर यांच्या बेजबाबदार वक्तव्यावरही संताप व्यक्त करत “त्या चारित्र्यावर बोलतात, हे अयोग्य आहे,” अशी प्रतिक्रिया देण्यात आली. दरम्यान, “मुख्यमंत्री साहेब, राजकारण करू नका,” असा टोला लगावण्यात आला असून खासदारांनी घाबरण्याचं कारण काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेतून दिलेली ‘क्लीन चीट’ नेमक्या कोणाला उद्देशून होती, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांकडून दिलेल्या स्पष्टीकरणामागे कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या सर्व घडामोडींमुळे फलटण प्रकरणाचा राजकीय स्वर अधिक तीव्र झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.