Rahul Gandhi News : भाजपच्या लोकांकडून संविधानावर हल्ला - राहुल गांधी | VIDEO

Parliament Winter Session : संविधानावरील चर्चेचा लोकसभेत आज दूसरा दिवस असून यावरून लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षात घमासान झालेलं बघायला मिळालं आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संविधान आणि मनुस्मृतीची प्रत दाखवत मनुस्मृतीवर देश चालणार नाही, असं म्हटलं आहे. संविधानावरील चर्चेचा लोकसभेत शनिवारी दुसरा दिवस होता. यावेळी संविधान आणि मनुस्मृतीच्या मुद्द्यावरून लोकसभेत चांगलाच गदारोळ झालेला बघायला मिळाला.

यावेळी भाजपकडून संविधानवर हल्ला होत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. हजार वर्षांपूर्वी एकलव्याचा अंगठा ज्या प्रकारे कापला गेला होता. त्याचप्रमाणे आज देशातील केंद्र सरकार तरुण आणि गरिबांना त्रास देत असल्याचंही राहुल गांधी यांनी म्हंटलं. पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, माझ्या मागील काही भाषणांमध्ये मी अभय मुद्रा बद्दल बोललो आहे. निर्भयतेबद्दल बोलले. लोक संविधानाला जगातील सर्वात लांब लिखित दस्तऐवज म्हणतात. आपल्या देशाच्या आकलनाचा तो दस्तावेज आहे. संविधान उघडल्यावर आपल्याला आंबेडकर, गांधी, नेहरू यांचे विचार ऐकायला मिळतात. हे विचार येतात कुठून? हे आपल्या प्राचीन संस्कृती आणि सभ्यतेतून आले आहेत. हे शिव, गुरुनानक, बुद्ध, कबीर यांच्यापासून आले आहेत. भारतीय राज्यघटनेची सर्वात वाईट गोष्ट म्हणजे त्यात भारतीय काहीही नाही. असे आपले नेते म्हणाले. ज्यांची तुम्ही पूजा करतात. हे सावरकरांचे शब्द आहेत. मला विचारायचे आहे की तुम्ही तुमच्या नेत्यांच्या शब्दावर ठाम रहा. जेव्हा तुम्ही संसदेत राज्यघटनेवर बोलता तेव्हा तुम्ही सावरकरांची निराशा करतात, असंही यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com