संपूर्ण राज्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढत आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या हंगामाच्या दुसऱ्याच महिन्यात नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटा जाणवू लागल्या असून, नागरिक अक्षरशः घामाघूम होत आहेत.
अशातच हवामान खात्याने विदर्भासाठी वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. तसेच, मराठवाड्यात वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या इतर भागांत मात्र ढगाळ वातावरणासोबतच तीव्र उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अचानक बदललेल्या या हवामानामुळे शेती पिकांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः द्राक्ष बागायतदारांसाठी ही परिस्थिती चिंताजनक ठरू शकते. द्राक्षपिकांना फटका बसण्याची शक्यता असून, वादळी वाऱ्यांसह पाऊस पडल्यास द्राक्षांचे मोठे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान तज्ज्ञांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.