शेतामध्ये जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांना पाटाच्या चारीवरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातील अकोला देव परिसरातील ही परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या या जीवघेण्या प्रवासाचा व्हिडीओ समोर आला आहे. शेतात जाण्यासाठी एकच रस्ता असल्याने पर्यायी पूल बांधून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जाफराबाद तालुक्यातील अकोला देव या गावातील शेकडो शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी आजही रस्ता नसल्याने पुराच्या पाण्यातून आणि पाटाच्या चारीवरून जीवघेणा प्रवास करून आपले शेत गाठावे लागत आहे. अकोला देव आणि बुटखेडा शिवारात जवळपास ४०० ते ५०० हेक्टर जमीन असून या परिसरात थोडा जरी पाऊस पडला तरी ओढे खळखळून वाहायला लागतात. त्यामुळे या शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून हा प्रवास करावा लागतो. दरम्यान या ओढ्यावर तातडीने पूल बांधून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.