बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार संघटनेच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. मात्र सरकारकडून कोणतीही ठोस प्रतिक्रिया न आल्यामुळे प्रहार कार्यकर्ते आक्रमक झालेत. अमरावतीत कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळत सरकारच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध नोंदवला. हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता असून शासनाकडून तात्काळ दखल घेण्याची मागणी करण्यात येतेय.
शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन यासह १७ मागण्या घेऊन बच्चू कडू उपोषणाला बसले आहेत. बच्चू कडू यांना राज्यभरातून पाठिंबा वाढत आहे तर दुसरीकडे त्यांची तबीयत खालावत चालली आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. अद्यापही सरकारकडून कोणताही तोडगा न निघाल्याने प्रहार चे कार्यकर्ते व शेतकरी आक्रमक झाले् आहेत. प्रहारच्या कार्यकर्त्यांचे अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले. अन्नत्याग आंदोलनामुळे बच्चू कडूंची प्रकृती खालावली,सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा शेतकऱ्यांचा व प्रहारच्या कार्यकर्त्यांचा आरोप. राज्यातील शेतकरी व प्रहार चे कार्यकर्ते राज्यभर ठिकठिकाणी करत आहेत आंदोलन.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.