राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आधी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली त्यानंतर ते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावे असी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे. यासंदर्भातच चर्चा करण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले आहेत. उपमुख्यमंत्रीपद, खाती आणि पोटनिवडणुकीवर त्यांच्यात चर्चा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवारांचे नाव आघाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांना महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. या मागणीमागे अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पवार कुटुंबातील नेतृत्वाला स्थिरता देण्याचा हेतू आहे. तसंच पक्षाच्या राजकीय समतोलासाठी ही भूमिका महत्त्वाची असल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे. सध्या या विषयावर राजकीय चर्चांचा वेग वाढला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.