Mumbai Water Crisis : मुंबईकरांवर पाणी कपाताची टांगती तलवार!पाणीसाठा आटला

Mumbai Faces Water Crisis : मुंबईला पाणीपुवठा करणाऱ्या धरणांमधील पाणी आटत चालले आहे. त्यामुळे पुढच्या काही महिन्यात हा पाणीसाठा अजून कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई: फेब्रुवारी महिना सुरू होताच मुंबईत तपमानचा पारा देखील चढायला सुरुवात झाली. आधीच तीव्र उन्हाच्या झळांमुळे मुंबईकर हे हैराण झाले असतानाच. आता या कडक उन्हाचा परिणाम हा पाण्यावर झाला आहे. या कडक उन्हामुळे मुंबईचा पाणीसाठा हा अर्ध्यावर आला आहे. या कडक उन्हामुळे तलावाच्या पाण्याचे बाष्पीभवन होत आहे आणि त्यातच पाणी गळती मुळे देखील पाणीसाठा हा अर्ध्यावर येऊन पोहचला आहे. म्हणून मुंबई महापालिकेने मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या 7 लाख 47 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. तसेच मे,जून महिन्यात हा साठा अधिक कमी होण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा हा दिवसेंदिवस वेगाने कमी होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात मुंबईकरांना पाणी पुरवठा देखील कमी होऊ शकतो.

Edited By Omkar Sonawane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com