मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
दादर पश्चिम रेल्वेस्थानक पाण्याखाली गेले.
प्रवाशांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुंबई, रायगड, कोकणात रेड अलर्ट आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जारी.
मुंबई : मागील काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून संततधार स्वरूपात बरसत आहे. मध्यरात्रीपासूनच मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना उन्हाच्या तडाख्याचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र, आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. विशेषतः दादर पश्चिम रेल्वेस्थानक पाण्याखाली गेले असून त्यामुळे प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली आहे. सकाळी ऑफिस आणि कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
भारतीय हवामान खात्याने मुंबईसह रायगड आणि कोकणात रेड अलर्ट जारी केला आहे. तर रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.