Monsoon Returns: परतीचा पाऊस महाराष्ट्रात कधीपर्यंत? हवामान विभागाने तारीख सांगितली

Monsoon Returns In Maharashtra: राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. १० ऑक्टोबरपर्यंत राज्यात परतीचा पाऊस कोसळणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

राज्यात परतीचा पाऊस सुरु झाला आहे. नेऋृत्य मौसमी वाऱ्यांमुळे परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारी मॉन्सूनने पश्चिम राजस्थानमधून माघार घेतली आहे, असं हवामान विभागाने जाहीर केले आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. यंदा तीन दिवस आधीच परतीचा पाऊस सुरु झाला आहे. वायव्य भारतात पावसाची सलग पाच दिवस उघडीप होती. आज राज्यात धुवाधार पाऊस सुरु आहे.महाराष्ट्रात मान्सून १० ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे, याबाबत हवामान खात्याने माहिती दिली आहे. त्यामुळे पुढचा एक महिना परतीचा पाऊस होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com