Sugar Export Ban : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! आता साखरेच्या निर्यातीवर तत्काळ बंदी; कारण काय?

India bans sugar exports till September 2026 : केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर तत्काळ बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने साखर निर्यातीवर तत्काळ बंदी घातली आहे. हा निर्णय आजपासूनच लागू झाला असून ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत ही निर्यातबंदी कायम राहणार आहे. देशांतर्गत साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

जागतिक बाजारपेठेत साखरेच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर होऊन साखरेचे दर वाढू नयेत, यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. साखरेचा समावेश आता 'निर्बंधात्मक' श्रेणीतून काढून 'प्रतिबंधित' श्रेणीत करण्यात आला आहे.

अमेरिका आणि युरोपियन युनियन या देशांना विशेष कोठ्यांतर्गत (CXL आणि TRQ) होणारी साखर निर्यात सुरू राहणार आहे. ज्या साखरेची निर्यात प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे किंवा जी साखर 'एक्सपोर्ट पाईपलाईन' मध्ये आहे, त्या निर्यातीवर कोणतीही बंदी नसेल. दोन देशांच्या सरकारांमध्ये (G2G) होणाऱ्या करारांनुसार होणारी निर्यात सुरू राहू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com