MMRDA’s New Plan: Direct Mumbai Access from Samruddhi Expressway Without Traffic : समृद्धी महामार्गावरून सुसाट आलेल्या वाहनधारकांची आमने-ठाणे दरम्यानच्या वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार आहे. त्यासाठी आमने-साकेत दरम्यान 6 हजार कोटी रुपये खर्चून सुमारे 29 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग बांधला जाणार आहे. त्यामुळे सदरचे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर समृद्धीवरून आलेल्या वाहनधारकांना वाहतूक कोंडीशिवाय मुंबईत पोहोचता येणार आहे. नागपूर-मुंबई 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गावरून आलेल्या वाहनधारकांची सध्या आमने पासून ठाणे या प्रवासाला वाहतूक कोंडीमुळे दीड-दोन तास वेळ लागतोय. (MMRDA new plan for Samruddhi Expressway to Mumbai connectivity)
एमएमआरडीएकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावरून थेट मुंबईत प्रवेश सुसाट होणार आहे. आमने-साकेतदरम्यान तब्बल ६ हजार कोटी खर्चून २९ किमी उन्नत मार्ग उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडीतून वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.