Dada Bhuse On Toll Waives : टोल माफीच्या निर्णयावर दादा भुसेंची प्रतिक्रिया; पाहा नेमकं काय म्हणाले दादा भुसे

Cabinet Meeting : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली असून यात मुंबईकरांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

'महायुती सरकारच्या टोल माफीच्या निर्णयामुळे साधारण 2 लाख 80 हजार वाहनांना दिलासा मिळणार आहे. मुंबईकरांसाठी ही आत्यंतर आनंदाची बातमी आहे.' अशी प्रतिक्रिया मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठकीत मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर संपूर्ण टोल माफी करण्यात आल्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधीच महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. आज रात्री 12 वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत ही घोषणा केली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी घोषित होऊ शकते. त्यामुळे मंत्रिमंडळाची शेवटची बैठक ठरण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मागणी होत असलेल्या टोलमाफीची अखेर घोषणा केली आहे. त्यानंतर मंत्री दादा भुसे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com