राजकीय पक्षासह आमच्या मराठा जातीतील काहीजण मराठा समाजाला कन्फ्युज मध्ये ठेवण्याचं काम परत आहेत,नाव न घेता मनोज जरांगे यांच्यावर मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे यांनी टीका केली आहे. पुढे ते म्हणाले, कुणबी प्रमाणपञ कधीही रद्द होवु शकत, त्यामुळे मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून आरक्षण न देता थेट मराठा म्हणून आरक्षण द्याव मराठा क्रांती मोर्चाची भूमिका आहे.
ज्यांच्या कुणबी नोंदी निघतात त्यांना कुणबी म्हणून आरक्षण देण्यात यावे, परंतु ज्यांचा मराठा म्हणून उल्लेख आहे त्यांना आरक्षणापासून बाजूला काढण्याचे काम केलं असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले तर ते टिकणार नाही, आणि अनेक वर्षापासून आमची नोंद मराठा आहे त्यामुळे आम्हाला 50% च्या आतून मराठा म्हणून ओबीसीतूनच आरक्षण देण्यात यावं नाहीतर मराठा समाजावर अन्याय होईल. हैदराबाद गॅझेट संदर्भात निघालेल्या जीआरच आम्ही स्वागत केलं. मात्र तो जीआर फक्त कुणबी उल्लेख असलेल्यांनाच फायद्याचा आहे, मराठा म्हणून नोंद असणाऱ्याला नाही. आमची लढाई आम्हीच लढू मराठा म्हणूनच ओबीसी मधून आरक्षण घेऊ असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.