शिक्षकांना हव्या त्या ठिकाणी बदली मिळावी म्हणून शिक्षक अनेकदा खोट बोलत असतात. मात्र आता बदली प्रक्रियेत खोटं आजार किंवा दिव्यांगत दाखवून नियम चुकवणाऱ्या शिक्षकांना आता मोठा दणका बसणार आहे. ग्रामविकास विभागाने याप्रकरणी थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आणि दोषी शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यातील काही जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी बदली टाळण्यासाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि दिव्यांगत्वाचे कागदपत्रे सादर केल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने ही कडक भूमिका घेतली आहे. हा आदेश संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे. आता अशा प्रकारचे गैरप्रकार करणाऱ्यांना केवळ नोकरीवरून दूरच केलं जाणार नाही, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.