Maharashtra Politics: शहाजी बापू पाटलांचं अजब लॉजिक; म्हणे मी आमदार झालो असतो तर शिंदे मुख्यमंत्री झाले असते | VIDEO

Shahaji Bapu Patil’s Bizarre Logic: सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील हे नेहमीच आपल्या तूफान फटकेबाजीने चर्चेत असतात.

'काय झाडी काय डोंगर' या डायलॉगने सर्व राज्याला प्रचलित झालेले शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी एक अजब लॉजिक सांगितले आहे. विधानसभा निवडणुकीत शहाजी बापू पाटील यांचा पराभव झाला. दुसरीकडे राज्यात पुन्हा एकदा महायुतीने सत्तेवर काबीज मिळवले. परंतु एकनाथ शिंदेना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागल्याने ते कमालीचे नाराज झाल्याचे वृत्त देखील समोर आले होते. त्यावरून शहाजी बापू पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

मात्र त्यांनी या कार्यक्रमात बोलताना एक वेगळंच लॉजिक मांडल्याचे दिसून आले. ते म्हणाले, महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय राजकारण होऊ शकत नाही, मी निवडून यायला पाहिजे होतं. मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे हे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले असते. कारण मी 1995 साली निवडून आलो तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. मी 2019 साली निवडून आलो तेव्हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. असं अनोख लॉजिक शहाजी बापू यांनी लावलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com