आमदार रोहित पवार यांनी राज्यातील राजकारणाबाबत खळबळजनक दावा केला आहे. सत्तेतील सर्वात मोठा पक्ष आपल्याच मित्रपक्षांची शिकार करणार असून ही प्रक्रिया पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल, असं त्यांनी म्हटलंय. सध्या गाजत असलेले 'भोंदू प्रकरण' हे सहज नसून ते जाणीवपूर्वक बाहेर काढल्याचा आरोपही त्यांनी केला. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चेला उधाण आले आहे.
रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर भलीमोठी पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले की, 'भाजपचे सत्तेतले मित्रपक्ष विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडणार असल्याच्या बातम्या बघितल्या, परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे, पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या त्यांच्या मित्रांचीच शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती आहे. महाराष्ट्राला काळिमा फासणारे भोंदू खरात प्रकरण असंच बाहेर आलेलं नाही तर ठरवून आणलं गेलं असून ही फक्त सुरुवात आहे. आज भाजप मित्रपक्षांप्रती जरी ‘ए दोस्ती हम नही छोडेंगे’ ची भावना दाखवत असले तरी उद्या मित्रपक्षांची भावना भाजपाबाबत “जा बेवफा जा हमे…” याहून वेगळी असणार नाही हे नक्की आहे. त्यामुळे आपलीच भाजपकडून शिकार होऊ नये यासाठी मित्रपक्षांनी अधिक काळजी घेणंच उचित राहील.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.