महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?
निवडणुका २०२६ च्या जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता.
राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढीसाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
ओबीसी आरक्षण आणि इतर कारणांमुळे निवडणुका अनेक वर्षांपासून रखडल्या आहेत.
रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यावर्षीही घेतल्या जाणार नाहीत. २०२६च्या जानेवारी महिन्यातच होण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी करणारं अर्ज राज्य निवडणूक आयोगानं सुप्रिम कोर्टात सादर केलं होतं. या अर्जावर आज सुनावणी होणार आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ४ ते ५ वर्षे ओबीसी आरक्षणासह विविध कारणांमुळे लांबणीवर आहे. त्यामुळे या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. या निवडणुका जानेवारी महिन्यातच होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.