राज्यात आजही पावसाचा जोर कायम राहणार असून हवामान विभागानं अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही भागांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि घाटमाथ्याच्या भागांना रेड अलर्ट देण्यात आला असून, हवामान विभागाकडून नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक घाट आणि कोल्हापूर परिसरात यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. पावसामुळे नद्या, ओढ्यांचे पाणीपातळी वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क झालं आहे.हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील २४ ते ४८ तास राज्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.