Saam Impact : त्या शेतकऱ्यांना मिळणार निधी, सरकारचा जीआर; VIDEO

Farmer Fund : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दिला जाणारा निधी बंद करण्यात आला होता. साम टीव्हीच्या बातमीमुळं तो निधी पुन्हा सुरू करण्याचा शासन निर्णय सरकारने काढला आहे.

साम टीव्हीच्या सर्वात मोठ्या इम्पॅक्टची बातमी आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना निधीची मान्यता सरकारने बंद केली होती. ही बातमी साम टीव्हीने दाखवताच सरकारने जीआरमध्ये बदल केला आहे. शेतकरी कुटुंबांना तातडीचा निधी देणार असा जीआर आता सरकारने काढला आहे. आधी निधी नसल्याचं कारण देत सरकारने निधी बंद केला होता. मात्र, साम टीव्हीनं बातमी प्रसारित करताच निधी देण्याचा जीआर सरकारने काढला आहे.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांचा निधी बंद केल्याच्या परिपत्रकानंतर राज्य सरकारने सुधारित परिपत्रक काढले आहे. नव्या परिपत्रकानुसार आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीतून मदत देण्याचा कार्यवाहीचे आदेश देण्यात असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यापूर्वी काढलेल्या परिपत्रकानुसार शेतकरी आत्महत्यांचा अंदाज बांधता येत नसल्यानं मदत बंद करण्यात असल्याचं कारण महसूल आणि वन विभागाने दिलं होतं. साम टीव्हीच्या बातमीनंतर सरकारवर टीका व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर सरकारने आज सुधारित परिपत्रक काढले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com