राज्यात 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत समिती स्थापन करण्यात येणार आहे.एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल येणार आहे. त्यानंतर कर्जमाफीची प्रक्रिया सुरु होईल. काल विधानसभेत याबाबत माहिती देण्यात आली आहे. बच्चू कडू, राजू शेट्टी यांनी यासाठी आंदोलन केले होते. यानंतर एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर ३० जूनपर्यंत कर्जमाफी करु असं सांगितलं होतं. या समितीचा अहवाल आल्यानंतर दोन महिन्यात कर्जमाफी कशी केली जाईल, याबाबत अभ्यास केला जाईल. त्यानंतर ३० जूनपर्यंत कर्जमाफी करण्याचे स्पष्ट संकेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.