2021 च्या दरड दुर्घटनेनंतर 44 कुटुंबांचे पुनर्वसन अजूनही झालेले नाही.
ग्रामस्थ गेली चार वर्षे भाड्याने घरे घेऊन राहतात.
शासनाच्या निष्क्रियतेविरोधात स्वातंत्र्य दिनी आत्मदहनाचा इशारा.
साखर सुतारवाडीतील पक्की घरे धोकादायक घोषित असल्याने तिथे रहाता येत नाही.
रायगड जिल्ह्यातील पोलादपुर येथील साखर सुतारवाडी ग्रामस्थांनी गावात सरण रचून शासनाला आत्मदहनाचा इशारा दिला आहे. उद्या स्वातंत्र्य दिनी साखर सुतारवाडीतील हे आपद्ग्रस्त पुर्नवसनासाठी आत्मदहन करणार आहेत. 2021 च्या दरड दुर्घटनेतील दरडग्रस्त साखर सुतारवाडी ग्रामस्थांचे पुर्नवसन झाल नसल्याने भाड्याच्या घरात रहाण्याची वेळ आली आहे. वाडीत पक्की घर आहेत पण शासनाने ती धोकादायक जाहिर केल्याने त्या घरात रहाता येत नाही. पर्यायी साखर सुतर वाडीतील 44 कुटुंबांना गेली चार वर्ष भाड्याने घर घेऊन रहाण्याची वेळ आली आहे.शासन पुनर्वसन करीत नसल्याने पुनर्वसनाच्या ठिकाणी सरण रचून आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.