जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे आज अचानक दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर हल्ला केला असून यामध्ये 20 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पहलगामच्या बैसरन भागात हा गोळीबार झाल्याची माहिती सामोर आली आहे.
तर जखमी झालेले पर्यटक हे राजस्थान, महाराष्ट्रातले असून काही पुणे येथील आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे काही दिवसातच अमरनाथ यात्रा सुरू होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दहशतवादी हे पोलीस युनिफॉर्ममध्ये आले आणि त्यांनी हा हल्ला केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या हल्ल्यामागे टीआरएफ दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यानंतर गृहमंत्री शहा हे श्रीनगरकडे रवाना झाले आहे. तसेच पंतप्रधान यांनी देखील अमित शहा यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.