मुंबईसह वसई-विरार आणि मीराभाईंदर शहरात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली गेले असून नागरिकांसह चाकरमानी व शाळकरी मुलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विरार पूर्वेकडील विवा मार्ग, नारंगी रोड, एमबी स्टेट, जैन मंदिर रोड, नालासोपारा रोड, प्रगती नगर, बोळींज रोड, वसई फाटा अशा प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. परिणामी वाहनचालकांचीही मोठी तारांबळ होत असून वाहतूक कोंडीचे चित्र दिसत आहे.
शहरातील विविध भागांत पालिकेची पाणी उपसा यंत्रणा बसवलेली असली तरी ती कार्यान्वित नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यातून प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.