देशभरात नदी प्रदूषणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. त्यातच दक्षिणेकडील गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदी ही पानवेलीची विळख्यात अडकली आहे. त्यामुळे गोदावरीचा श्वास कोंडला आहे. या पानवेलीमुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पुढील दोन वर्षांनी नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा येऊ घातला आहे. या कुंभमेळयात कोट्यावधी भाविक येणार असल्याचा अंदाज आहे. हे भाविक मोठ्या श्रध्येने गंगेत स्नान करत असतात. कुंभमेळासाठी मोठ मोठ्या घोषणांचा पाऊस प्रशासन पाडत आहे. मात्र प्रत्यक्ष चित्र हे वेगळेच आहे. गोदावरी नदीतील पानवेलीकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नसल्याने गोदावरी नदी मोकळा श्वास कधी घेणार? नागरिकांच्या समस्या कधी मिटणार? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.