गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम असून, धरण ७६ टक्के भरले आहे. परिणामी, आज सकाळी ११ वाजेपासून गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे.यापूर्वी धरणातून ६०३ क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येत होते, मात्र आता हा वेग १२३५ क्यूसेकपर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक शहरासह गोदावरी काठच्या भागांमध्ये नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास, पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्याची शक्यता असून, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.सध्या जिल्ह्यातील एकूण १४ धरणांमधून कमी अधिक प्रमाणात विसर्ग सुरू आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क असून, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही तयार ठेवण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.