नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेत पिकांसह द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर आज कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्याच्या बांदावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 2 एप्रिल रोजी झालेल्या पावसामुळे 1217 हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. यात नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 30 गावांतील 1255 हेक्टरवरील बागायती शेतीचे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आज कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्याच्या बांधावर गेले होते तेथे त्यांच्यात आणि शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी शेतकऱ्यांनी कर्जमाफीवरून मंत्र्यांना जाब विचारला असता कोकाटे म्हणाले, तुम्हाला जे सरकारकडून पैसे येतात ते पैसे तुम्ही शेतीमध्ये गुंतवता का? इथे मीडियासमोर आहे मी जास्त बोलणार नाही पण तुम्हाला कर्जमाफी झाल्यावर जे पैसे येतात त्याची तुम्ही 1 रुपयाची तरी गुंतवणूक करता का? असा सवाल विचारला आणि शेती भांडवलीला तुम्हाला सरकार पैसे देणार पण तुम्ही विम्याच्या आलेल्या पैशांनी पोरांचे लग्न आणि साखरपुडे लावता असे वक्तव्य कोकाटेंनी शेतकऱ्यांसमोर केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.