नागपुरात झालेल्या शेतकरी आंदोलनात नेते रविकांत तुपकर यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी संपूर्ण कर्जमाफीची मागणी करत सरकारला थेट इशारा दिला. यावेळी बोलताना रविकांत तुपकर म्हणाले, 'जसं बच्चू भाऊंनी सांगितलं आमदारला कापा, मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो दोन चार मंत्र्याला कापा'. संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही.', असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे. पोलिसांच्या बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील, पण आमच्या छात्या कमी पडणार नाहीत, असे म्हणत त्यांनी आंदोलनाची तीव्रता दाखवून दिली. नेपाळमधील मंत्र्यांवरील हल्ल्याचा दाखला देत, महाराष्ट्रातील मंत्र्यांनाही पळवून लावू, असा इशाराही त्यांनी दिला. आत्महत्या करण्याऐवजी सरकारसोबत संघर्ष करण्याचा मार्ग त्यांनी शेतकऱ्यांना दाखवला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.