राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे या नव्या समितीमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना स्थान देण्यात आलं आहे. त्याचबरोबर महसूल, मदत आणि पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन तसंच आरोग्य मंत्र्यांचाही समावेश असल्याचं समजत आहे. मात्र या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदे यांना समितीमधून डावलण्याचा अर्थ राजकीय धक्का मानला जात आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशी कोणतीही गोष्ट होत नाही आहे. शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापनातून वगळलं हे चुकीचं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हंटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.