एकनाथ शिंदेंचा मनोज जरांगेंना सल्ला: भक्तांची गैरसोय टाळा
मराठा आंदोलन आणि गणेशोत्सव एकाच काळात सुरू असल्याने सरकारची चिंता
शिंदे कमिटी व गायकवाड आयोगाद्वारे कुणबी दाखले उपलब्ध
कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आंदोलन संयमाने करण्याचे आवाहन
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे रवाना झाले असून त्यांच्यासोबत लाखो मराठा बांधव आहे. अशातच गणपती उत्सव आज सुरू झाल्याने आंदोलन आणि गणेशभक्तांची गर्दी झाल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सरकारने मनोज जरांगे यांना मोर्चा थांबवण्याचे आवाहन केले आहे. याच संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन आणि हक्क मागण्याचा अधिकार आहे. पण आपल्या आंदोलनादरम्यान इतरांना त्रास होता कामा नये. तसेच मागच्या काळात आमच्या सरकारने 10 टक्के आरक्षण दिले होते आणि ते आजही कायम आहे. शिंदे कमिटी, गायकवाड आयोग यांच्या मार्फत आम्ही कुणबी दाखले दिले आहे. तसेच गणेशोत्सव काळात लाखो गणेशभक्त हे मुंबईत येत असता या आंदोलनामुळे त्यांची गैरसोय होऊ नये याची जरांगेनी काळजी घ्यावी असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.