Sambhajinagar News | कंपनीचे केमिकल थेट शेतकऱ्यांच्या विहिरीत, पैठणमधील धक्कादायक प्रकार

छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीला केमिकलयुक्त पाणी येत आहे. यामुळे त्यांच्या शेतीला नुकसान होत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या विहिरीत केमिकल सोडले आहे. एमआयडीसीतल्या एका कंपनीतून हे केमिकल सोडल्याचा आरोप या शेतकऱ्याने केला आहे. पैठण तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या विहीरीत केमिकल आल्यामुळे हे पाणी निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या पाण्यामुळे शेतीची नापिकी तर झालीच आहे. तसेच हे पाणी पिण्याच्या लायकीचेही नसल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. शासन दरबारी याप्रकरणी आपण अनेक तक्रारी केल्या पण सरकारने काहीच कारवाई केली नाही अशी माहिती या शेतकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिण्यासाठी विकत पाणी घ्यावे लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com