Pension: मोठी बातमी! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पेन्शनचा प्रश्न अखेर सुटला

Government Employees: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पेन्शनचा प्रश्न सुटला आहे. राज्यातील राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अखेर राज्य शासनाने सुधारित निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी केली

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पेन्शनसंदर्भातील प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. राज्यातील राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अखेर राज्य शासनाने सुधारित निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी केली आहे. मूळ वेतनाच्या ५० टक्के पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या २ वर्षांपासून या निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि २०२४ पासून आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा संभ्रम आता वित्त विभागाने शासन निर्मयनिर्गमित केल्यामुळे दूर झाला आहे. जुनी पेन्शन की नवी पेन्शन या वादात अडकलेल्या कर्मचाऱ्यांना आता सुधारीत योजनेचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने या निर्णयाद्वारे मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे निवृत्त आणि कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण असून दीर्घकाळ सुरू असलेल्या मागण्यांना अखेर यश मिळालं आहे. सरकारच्या या निर्णयाचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com