Maharashtra Politics : तिसऱ्या आघाडीवर शिक्कामोर्तब; बघा काय म्हणाले बच्चू कडू

Bachchu Kadu : बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीवर शिक्कामोर्तब झालं असल्याची माहिती दिली आहे. 'परिवर्तन महाशक्ती' या नावाने ही तिसरी आघाडी करण्यात येणार आहे.

राज्यातील तिसऱ्या आघाडीवर शिक्कामोर्तब झालं असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. 'परिवर्तन महाशक्ती' या नावाने ही तिसरी आघाडी करण्यात येणार असून याची लवकरच घोषणा करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं आहे. पुण्यात गुरुवारी या तिसऱ्या आघाडी संदर्भात बैठक झाली आहे. ''आघाडी पण नाही, युती पण नाही, आमची 'परिवर्तन महाशक्ती' म्हणून आम्ही समोर जाणार,'' असं बच्चू कडू यांनी यावेळी बोलताना म्हंटल.

आगामी विधानसभेच्या दृष्टीने राज्यात रोज नवीन समीकरणं तयार होत आहेत. अशातच राज्यात तिसरी आघाडी स्थापन होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता यावर शिक्कामोर्तब झालं असून याबद्दल बच्चू कडू यांनी माहिती दिली आहे. पुण्यात यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीला बच्चू कडू, राजू शेट्टी आणि शंभुराज देसाई उपस्थित होते. 'परिवर्तन महाशक्ती' या नावाने ही तिसरी आघाडी करण्यात येणार आहे. तिसऱ्या आघाडीत समन्वय समिती करून सगळे निर्णय घेतले जातील, ज्यांना या आघाडीत यायचं आहे त्यांनी 26 सप्टेंबरपर्यंत सहभागी व्हायला हवं असं आवाहनही राजू शेट्टी यांनी केलं आहे. या तिसऱ्या आघाडीचा मेळावा येत्या 26 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे. दरम्यान, या तिसऱ्या आघाडीमुळे विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीची समीकरणं बदलतील का? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com